*देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने जे चांगलं असेल ते घडावं; विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना* *घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून शेकडो भक्तांचा श्री दत्तचरणी मंत्रघोष*

Share This News

पुणे दि.१७: विधिमंडळातील भाषण ऐकून नेहमीच प्रभावित व्हायचे मात्र कष्ट दूर करणे, त्याचबरोबर सुखद संपन्नता मिळणं, मनाला स्वास्थ्य मिळणं या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने आत्ताच्या काळामध्ये एवढे भाविक एकत्र येतात आणि स्तोत्र म्हणतात हे पाहून मन प्रभावित झाले आहे. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने जे काही चांगलं असेल ते घडावं अशी श्री दत्तगुरूंच्या चरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रार्थना केली.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवार तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्त मंदिरा समोरील उत्सव मंडपात दत्तजयंती उत्सवाचे शुभारंभा निमित्ताने करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प.पू.बाबा महाराज तराणेकर (इंदोर), दत्तमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त डॉ. पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. घोरात्कष्टात मंत्र पठणातून सर्वांचे मंगल व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आज या कार्यक्रमानिमित्ताने प पू तराणेकर गुरुजींशी परिचय झाला असला तरी इंदोरशी आमच्या घराण्याचे पूर्वीपासूनचे एक नात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. डॉ. गोऱ्हे यांचे आजोबा शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होते ते माधवनाथ महाराजांचे खूप मोठे भक्त होते. त्यामुळे घरामध्ये आजतागायत गेली शंभर वर्ष तरी सातत्याने दर गुरुवारी दत्ताची आरती आणि उपासना होत असते. अगदी अधिवेशन असले तरी त्याचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. दत्तगुरु महाराजच आपल्याला सगळा मार्ग दाखवतात त्यांच्यावर आपला विश्वास आहे, ठाम खात्री आहे आणि त्यामुळे जे आम्हाला विरोध करतात त्यांना पण दत्तगुरु कधी ना कधी चांगली सद्बुद्धी देतील अशी खात्री देखील डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

दत्त मंदिर विश्वस्त मंडळाने शासनाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यापूर्ण करण्याबद्दल सहकार्य केले जाईल असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
——